शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:42 IST

मनोज मुळ्ये ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक आज, सोमवारी होत असून, यामध्ये रिफायनरी प्रकल्पासाठीचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. संपादित केल्या जाणाºया जमिनीला हेक्टरी ७० ते ८० लाख रुपये दिले जाण्याची शक्यता असून, रोजगार तसेच पुनर्वसनाबाबतची घोषणा या बैठकीत होण्याची ...

मनोज मुळ्ये ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक आज, सोमवारी होत असून, यामध्ये रिफायनरी प्रकल्पासाठीचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. संपादित केल्या जाणाºया जमिनीला हेक्टरी ७० ते ८० लाख रुपये दिले जाण्याची शक्यता असून, रोजगार तसेच पुनर्वसनाबाबतची घोषणा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.नाणार, सागवे परिसरातील १४ गावांमध्ये देशातील सर्वांत मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र स्थानिक लोकांनी या प्रकल्पाला ठाम विरोध केला आहे. अलीकडेच या विरोधाची धार आणखी तीव्र झाली आहे.हा प्रकल्प केंद्र सरकारचा असल्याने त्याबाबत राज्य सरकार आग्रही आहे. मुख्यमंत्र्यांनी याआधीही प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी सर्वांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. आज, सोमवारी दुपारी २ वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी, माजी आमदार प्रमोद जठार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रकल्पाला विरोध करणाºया समितीसह प्रकल्पाशी निगडीत सर्व समित्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.या बैठकीत ग्रामस्थांसाठी जमिनीचा दर, पुनर्वसन तसेच रोजगार अशा तीन प्रमुख मुद्यांंसह अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा होणार आहे.स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पस्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प उभारणी केली जाईल. स्थानिकांना डावलून कोणताही निर्णय होणार नाही. स्थानिक लोकांच्या सर्व शंका दूर करूनच हा प्रकल्प उभारला जाईल, याची हमी मुख्यमंत्र्यांनीही याआधी दिली आहे. स्थानिक ग्रामस्थांना वाºयावर सोडले जाणार नाही. त्यांच्या हिताचाच निर्णय सरकार घेईल, असे माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सांगितले. आपण या बैठकीसाठी मुंबईत आलो असल्याचेही ते म्हणाले.शिवसेनेची भूमिका आणि बैठकशिवसेनेच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांनी संशय व्यक्त केल्यामुळे शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेने ही भूमिका जाहीर केल्यामुळे विरोधाला आणखी वेगळे वळण लागू नये, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची शक्यता आहे.संभाव्य पॅकेजजमिनीचा दर प्रति हेक्टरी ७० ते ८० लाख मिळण्याची शक्यतापुनर्वसनासाठी ३०० हेक्टर क्षेत्रात टाऊनशीप उभे राहण्याची शक्यतास्थानिकांना रोजगार आणि त्यासाठीच्या प्रशिक्षणाची व्यवस्था